एकाच वेळी तीन ट्रान्सफॉर्मर बिघडल्याने नवापूरात विद्युत पुरवठा खंडित , उकाड्याने नागरिक त्रस्त

पंखे, एसी बंद, ४३ अंश तापमानात लोकांना घाम फुटला रेबजेब अंधारात रात्र काढावी लागली नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    शहरातील नगरपालिका हद्दीतील विविध भागात काही कारणास्तव महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे तीन ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले आणि ४८ तास वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे येथील रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. अडचणीत आणले होते. ४३ अंश उन्हाळ्यात अशाप्रकारे रहिवासी भागातील वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या विरोधात रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
   नवापूर शहर परिसरातील नवभारत हौसिंग सोसायटी, कॉलेजरोड, देवलफळी येथे लावलेला विजेचा ट्रान्सफॉर्मर बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास खराब झाला. मेमन गली, नारायणपूर रोड, टिन
नवापूर शहरात तीन ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सरकारी कार्यालयातील पंखे, एसी बंद पडून कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांना दीड दिवस मनस्ताप सहन करावा लागला. टेंभा, शांतीनगर, जनता पार्क, सैफ अली पार्क, पोलिस स्टेशन, कॉलेज रोडसह अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. 
     त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाजही ठप्प झाले होते. सतर्क लोकांनी वीजपुरवठा बंद झाल्याची माहिती महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला दिली. बुधवारी सायंकाळी वीज पथकाने ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला.
  त्यानंतर पुन्हा दोन तास वीज गेली, त्यामुळे उन्हाळ्याच्या कडकडाटामध्ये लोक होरपळून निघाले. दिवे, पंखे बंद असल्याने अंधार आणि उन्हामुळे लोकांची अवस्था बिकट झाली आहे. विजेअभावी पिण्याच्या आणि वापरासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली. सातारा येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता वीज कर्मचाऱ्यांनी क्रेनद्वारे दुसरा ट्रान्सफॉर्मर बसविल्याने वीजपुरवठा पूर्ववत झाला.

Post a Comment

Previous Post Next Post