वेतना सह शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा

धुळे सत्यप्रकाश न्युज 
   राज्यातील नुकत्याच निवडून आलेल्या महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारचे तात्कालीन शिक्षण मंत्री मा. ना. श्री दीपक केसरकर साहेब यांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान मैदानावर येत आणि कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन ज्या शाळा 20 टक्के, 40 टक्के, 60% अनुदान घेत आहेत त्या शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देणे व राहिलेल्या आघोषित शाळांना घोषित करून 20 टक्क्यावर अनुदानित करणे व ज्या शाळा त्रुटीतील शाळा होत्या व त्यांनी काही दिवसांपूर्वी त्या त्रुटी पूर्ण केलेल्या होत्या, परंतु त्या शाळा अगदी काहीतरी शुल्लक कारणाने अपात्र ठरवण्यात आल्या होत्या, अशा विनाकारण अपात्र करण्यात आलेल्या शाळांना देखील अनुदानाचा समान टप्पा देण्याच्या संदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता. व निवडणुकीनंतर अनुदानाचा पुढील टप्पा देण्याची युती सरकारने व तत्कालीन मा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सदनात जाहीर केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या व या निवडणुकीत महायुतीला भरघोस असं यश मिळालं आहे आणि नुकतेच महायुती सरकार तर्फे शिक्षण मंत्री देखील जाहीर करण्यात आले आहेत, पण गेल्या दहा दिवसात मंत्रिमंडळ व शिक्षण मंत्री घोषित होऊनही अद्याप महायुती सरकारने शिक्षकांना आश्वासन दिलेल्या प्रमाणे अनुदानाच्या पुढील टप्प्याची अद्याप अंमलबजावणी व त्रुटीतील शाळा, राहिलेल्या आघोषित शाळा यांचा निर्णय होऊन देखील त्या संदर्भात जीआर (शासन निर्णय) काढण्यात आला नाही. म्हणून शिक्षण मंत्री महोदयांनी तात्काळ याबाबत निर्णय घेऊन पुढील टप्पा अनुदानाचा जीआर काढण्यात यावा ही मागणी करण्यासाठी व पुढील टप्पा अनुदान व आघोषित शाळांना घोषित करण्या संदर्भात नेमक्या काय अडचणी आहेत यासाठी शुभांगी ताई पाटील यांनी मंत्रालय स्तरावर काल जाऊन राज्याचे शिक्षण सचिव, उपसचिव तसेच कक्ष अधिकारी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. व लवकर अनुदानाच्या पुढील टप्प्याचा जीआर काढण्यासाठी विनंती केली. तसेच येणाऱ्या काही दिवसात हा जीआर शिक्षण मंत्रीं महोदयांनी काढावा आणि माझ्या हजारो शिक्षक अनुदानाचा शासन निर्णय निघतो की नाही! या भीतीने घाबरलेले आहेत त्यांना हा जीआर काढून भयमुक्त करावे अशी माफक अपेक्षा नूतन शिक्षण मंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आली.
 तसेच महाराष्ट्रातील 100% वेतन घेणाऱ्या अनेक शाळेतील शिक्षकांचे पगार येणाऱ्या महिन्यात होणार नाहीत! अशा आशयाच्या बातम्या सध्या वर्तमानपत्रात व सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या संदर्भातही मंत्रालयात पाठपुरावा करण्यात आला. त्या संदर्भातील लवकर निर्णय होऊन या सर्व शिक्षकांचे पगार वेळेवरकरण्यात येईल असे मंत्रालय स्तरावरून पाठपुराव्या अंती मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post