कालच्या केंद्र संचालकांच्या आदली बदलीच्या विषयाला, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किशोर दराडे,आमदार जयंत आजगावकर सर, यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची भेट घेऊन केंद्र संचालकाच्या आदली - बदलीचा जीआर रद्द करा अशी मागणी केली होती त्यानुसार आज शिक्षण मंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदर शासन आदेशामध्ये बदल केला असून ज्या केंद्रावर कॉपी कॉफीची प्रकरण आढळलेली आहेत अशाच ठिकाणी केंद्राध्यक्ष पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांची बदली करावी अशा सूचना दिलेल्या आहेत व त्यानुसार शासनाने पुढिल आदेशाचे पत्र प्रसिद्धिस दिले आहे
राज्यातील सर्व शिक्षकांच्या वतीने शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांचे खूप खूप आभार*उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ कॉपीमुक्त अभियान राबविणेबाबत शासनाने पारित केलेलया संदर्भापत्रानुसार या कार्यालयाचे पत्र क.रा.म./ परीक्षा-५/२०१, दि. १७/०१/२०२५ रोजीने पत्राद्वारे कळविले आहे की
उपरोक्त विषयाबायत आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्ण गाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात पेमारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११/०२/२०२५ ते दि. १८/०३/२०२५ व माध्यमिक शास्त्रशना प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २१/०२/२०२५ ते दि. १७/०३/२०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, उपती सभाजीनगर, मुंबई, कोलापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
दि. १७/०१/२०२५ रोजीच्या पत्रान्वये केंद्रसबालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीच्या नियुक्तीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मा. लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत. रायथ फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उव्य माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालामा प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा निकोष वातावरणात पार पाडण्यासाठी पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत
१) कोरोना काळातील सन २०२१ व सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षांमधी ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना व्यतिरिक्त इतर तर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्यांमधुन करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
२) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्रमान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्यात येईल
३) याचबरोबर उपरोक्त दोन्ही बाबींशिवाय मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ायात इ. १० वी व इ. १२ वीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहील.
४) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्ला दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकायनि परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथकांच्या भेटी होतील माचे नियोजन करावे.
उपरोक्त प्रमाणे कॉपीमुक्त अभियानावावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची सर्व जबाबदारी विभागीय मंडळांची राहील याची नोद घ्यावी असे (देविदास फुलाक) सचिव, राज्यमंडाळ, पुणे-०४.यांनी कळविले आहे
Tags:
शैक्षणिक