जिल्ह्यात उद्या पासून सुरू होणाऱ्या बोर्डाचा बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीसाठी मनाई आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात बाहेरील व्यक्तींना प्रवेशास बंदी-परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे, एस.टी.डी./आय.एस.डी. टेलिफोन, फॅक्स केंद्र आणि ध्वनीक्षेपक बंद राहणार- फक्त अधिकृत परीक्षा कर्मचारी, पोलीस व परीक्षार्थीनाच प्रवेश परीक्षेच्या दिवशी सकाळी 8:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील. विद्यार्थ्यांनी शांततेत आणि निर्भयपणे परीक्षा द्यावी, तसेच नागरिकांनी सहकार्य करावे-ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकांना याची माहिती मिळेल.
Tags:
शैक्षणिक